वटपौर्णिमेचे औचित्य साधून बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी व्हावे वृक्षारोपण
भारतीय संस्कृतीत प्रत्येक झाडांना आगळेवेगळे स्थान व महत्त्व आहे.त्यात वटवृक्ष म्हणजे मायेची सावली व शांतीचे प्रतीक आहे.वटपौर्णिमेला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.सावित्री हे भारतीय संस्कृतीत एक ऐतिहासिक पात्र मानले जाते.सावित्री म्हणजे वेद माता गायत्री आणि सरस्वती. वटवृक्ष एक विशालकाय वृक्ष आहे.ज्यामध्ये त्या झाडाची जटा लटकत असतात.यालाच सावित्री देवी मानले जाते.हिंदु पुराणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे वटवृक्षात राहतात असे मानले जाते.या झाडांच्या मुळामध्ये ब्रम्हा, मध्यभागी विष्णू आणि वरच्या भागात शिव आहे.म्हणून या झाडाच्या पुजेला अत्यंत महत्व आहे.कारण वटवृक्षाच्या पुजेने साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन होते.त्यामुळे आज आपल्याला अशाच वृक्षांची नितांत गरज आहे.यावरून स्पष्ट होते की वटवृक्ष एक दैवी शक्तीचे प्रतीक आहेच हे आपल्याला पुराण सुध्दा सांगते.परंतू आज मानवाचा व संपूर्ण जीवजंतूच्या कल्याणासाठी व जीवनमरणाचा प्रश्न ऑक्सिजनवर येवुन ठेपला आहे.कारण दिवसेंदिवस पृथ्वीतलावरील ऑक्सीजनचे प्रमाणात कमी श-कमी होत आहे.यामुळे मानवासह संपूर्ण जीवजंतूचे जीवन धोकादायक स्थितीत येवून ठेपले आहे.त्यामुळे आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात वृक्षलागवडीला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.कारण आपण जेवढे वटवृक्ष लावू तेवढीच ऑक्सिजनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून मानव,पशुपक्षी व पृथ्वीतलावरील संपूर्ण सृष्टीत आल्हाददायक वातावरणात निर्माण होण्यास मोठी मदत होईल.आज आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक झाडात, पानात, फुलात, मुळात, फळात देवी-देवतांचा वास आहे. त्यामुळेच आपण आज या धरतीवर सुखरूप आहोत व मोकळा श्वास घेऊ शकतो.परंतु वृक्ष तोड किंवा जंगल तोड वेळीच थांबली नाही तर पृथ्वीतलावरील संपूर्ण जीव सृष्टीचा विनाश कोणीही रोखू शकणार नाही हे सुद्धा कटु सत्य आहे. त्यामुळे प्रत्येक सनाला, वाढदिवसाला, लग्न कार्यक्रम या दिवसाला वृक्ष लागवड व्हायलाच हवी.वटपौर्णिमेप्रमाणे ३६५ दिवसांमध्ये जे कोणते सण येतात त्या-त्या सणाला वृक्षारोपण करून आगळावेगळा उपक्रम राबवायला हवा.तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे सुध्दा वृक्षारोपण व्हायला हवे.असे जर झाले तर देशात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल व ऑक्सिजनची मात्रा वाढण्यास मोठी मदत होईल. आपण जगात किंवा भारतात जी काही औषधे पहातो ती कोणतीही असो उदाहरणार्थ ऍलोपॅथिक,आर्युवेदिक, होमिओपॅथिक किंवा जडी-बुटी या ज्या औषधी तयार होतात त्या संपूर्ण वनस्पती पासुनच तयार होतात.त्यामुळे वृक्ष लागवड काळाची गरज आहे.सावित्री आणि सत्यवान यांची कथा अनेक पुराणांमध्ये पहायला मिळते.नारद मुनी सावित्रीला सत्यवानशी लग्न न करण्याचा सल्ला देते.कारण सत्यवान यांचे जीवन काही काळापर्यंत मर्यादित असते.परंतु सावित्री नारदमुनीला न जुमानता सत्यवानशी लग्न करते.तीला पतीच्या मृत्यूची तारीख माहीत असते.अशा परिस्थितीत शिल्लक रहालेल्या दिवसात सावित्री कठोर तपश्चर्या करते.परिणामत: आपल्या पतीला मृत्यूच्या खाईतून बाहेर काढते.यामागे वटवृक्षाची लीला असते.कारण वटवृक्षांमध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे हे सावित्रीला तपश्चर्ये दरम्यान लक्षात आले व सावित्रीच्या मदतीसाठी स्वयंम ब्रम्हा, विष्णू आणि महेश प्रगट होतात व सावित्रीची मनोकामना पूर्ण होते.हे आपल्याला पुराणात सांगीतले आहे.त्याच अनुषंगाने वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून महिला सुख-समृध्दीची आराधना करतात व वटवृक्षाच्या रूपात विराजमान असलेले ब्रम्हा, विष्णू आणि महेश व सावित्री यांचे साक्षात दर्शन घेऊन महिला स्वतःला धन्य मानतात.परंतु आज वटवृक्षाची गरज आपणासर्वांनाच आहे.कारण सत्यवानाला वाचवीण्यासाठी सावित्रीने वटवृक्षाचा सहारा घेतला व वटवृक्षाने सावित्रीला सत्यवानाला वाचविले सुध्दा.आज आपल्याला देशाच्या १४० कोटी जनतेचे प्राण वाचवायचे आहे. यासाठी आपल्याला सुध्दा वृक्षलागवडीच्या माध्यमातून तपश्चर्या करावीच लागेल.तेव्हाच आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा मिळण्यास मोठी मदत होईल व आपणा सर्वांना वटवृक्षाच्या रूपात साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश व सावित्री यांचे दर्शन होईल.भारतीय संस्कृतीतील कोणताही सण असो त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,धार्मिक, आरोग्य विषयक इत्यादींना धरून असतोच.त्यामुळे सर्वांनीच वृक्ष लागवडीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. वटवृक्ष हा मायेचा आधार आहे कारण तो सर्वांना सावली देतो. त्यामुळे वटवृक्ष हे शांतीचे व मांगल्याचे प्रतीक सुध्दा आहे. सध्याच्या परिस्थितीत पृथ्वी,जल,वायु धोकादायक स्थितीमध्ये आहे.त्यांना वाचविण्याची संपूर्ण जबाबदारी मानवाची आहे. कारण मानव हा बुध्दीजीव प्राणी आहे. आज पृथ्वीतलावर जगात जी काही विनाश लीला दिसत आहे त्याला दोषी फक्त मानवच आहे.ही विनाश लीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.आज वृक्ष म्हणजे दैवी शक्तीच आहे.वड, आंबा,आवळा, कडुनिंब,उंबर,केळी, आपट्याचे झाड,बेल,पळस इत्यादीसह अनेक झाडांच्या पानांचा,फुलांचा व फळांचा पुजेमध्ये वापर करीत असतो. आज स्त्री शक्ती वृक्षांना वाचवीण्यासाठी वृक्षांची पुजा अर्चना करीत आहे.तर मनुष्य दुसरीकडे जंगल तोड करीत आहे याला कुठेही थांबवायला हवे.पर्यावरण रक्षणासाठी १९७३ मध्ये चिपको आंदोलन करण्यात आले यात मोठ्या संख्येने महिलांनी भाग घेवून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड थांबवीली.यामागचा उद्देश म्हणजे झाडांना वाचवीने.या आंदोलनामुळे शेकडो झाडे, हजारो पक्षी व प्राण्यांची निवासस्थाने वाचली.झाडे लावा,झाडे जगवा, निसर्ग सुरक्षित तर आपण सुरक्षित, आपण सुरक्षित तर देश सुरक्षित, देश सुरक्षित तर जग सुरक्षित हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे. यामुळे संपूर्ण सृष्टीत प्रफुल्लित होईल.वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.