कृषीवार्ताब्रेकिंगसामाजिक
निफाङला माणुसकी फांऊङेशनच्या वतीने वङाचे रोपटे वाटप

0
3
2
9
4
9
वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या रोपांचे वाटप
निफाडच्या माणुसकी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
निफाड – आपल्या परंपरा संस्कृती चे जतन करतांना आपण निसर्ग संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण निसर्ग आणि मानवी जीवनाचे नाते अतुट आहे. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत जिव्हाळा तसेच मनातील आपल्या पतीबद्दल च्या भावना वडपुजनाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. परंतु ज्या वडाच्या झाडाचे ऐतिहासिक काळापासून धार्मिक तसेच वैज्ञानिक पातळी वर अनन्य साधारण महत्व आहे अशा वडाच्या झाडांचे संवर्धनही महत्वाचे आहे. हिच भावना लक्षात घेऊन निफाड येथे माणूसकी फाऊंडेशन च्या वतीने मा. सागर निकाळे तसेच मिञपरिवार हयांच्याकडुन रोपे वाटप करण्यात आली. महिलांनी पुजा जरुर करावी त्यासोबत वडाच्या झाडांची लागवड करुन निसर्ग जपण्याचा वारसा समृद्ध करावा त्याचप्रमाणे सामाजिक स्तरावर हा महत्वपूर्ण संदेश जावा हया हेतूने हा उपक्रम आयोजित केला होता…याप्रसंगी मालीनी वाघ.मैना पर्वत,गुंताबाई जाधव, जिजाबाई महाजन.शांताबाई जाधव.हिराबाई जाधव आदी महिला उपस्थितीत होत्या
0
3
2
9
4
9