
0
2
5
5
5
9
मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने कवी संमेलन संपन्न
नांदगाव-प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- मराठी भाषा दिनाच्या मुख्याध्यापक संघ हॉल शिवाजी पार्क कोल्हापूर येथे गौरव मराठीचा या विषयावर कवी संमेलन तसेच चर्चासत्राचे आयोजन केले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री अमोल पराडकर व रोहिणी अमोल पराडकर यांनी उत्कृष्टरित्या केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका पाटील यांनी केले. उद्घाटक श्री.बी.एस. कांबळे यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले की, मराठी भाषा दिन औचित्य साधून अर्लियन कवियोंका अध्यात्म ग्रुप समूहाने जो हा उपक्रम घेतला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे एक नवीन संदेश सगळीकडे रुजु झाला. आणि अशी सुरुवात होत राहील. मराठी भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळत राहील. कवी संमेलन अध्यक्ष श्री दीपक पवार सर यांनी सर्वांच्या काव्य वाचनावर अभिप्राय व्यक्त केले.
सौ. शैलजा परमणे व श्री. दत्तात्रय गुरव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सौ. स्मिता कुलकर्णी त्यांच्या काव्य वाचनाने काव्य संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी निमंत्रित कवी दीपक पवार, सतीश भारतवासी, वीणा पाटील, सौ. अपूर्वा पाटील, सौ. वनिता पाटील, दत्तात्रय गुरव, बी.एस. कांबळे, सुधा जाधव, निशा खरात (शिंदे), सारिका पाटील, कुमारी मनाली शेडबाळे इयत्ता नववी, सौ. कविता शेट्ये,सौ. सुलोचना पाटील, सौ. रोहिणी अमोल पराडकर उपस्थित होते.
सर्वांनी मराठी भाषेचा गौरव यावर कविता सादर केल्या. ग्राफिक्सकार या पदावर कार्यरत असलेले अमोल पराडकर यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. शेवटी उपवासाची खिचडी, किरण राजगिरा लाडू व लस्सी यांचा स्वाद घेत अभिजात मराठी भाषा यावर चर्चा केली. व पुढील कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0
2
5
5
5
9