
0
3
2
9
4
9
सावीञीच्या लेकीचा सातवी पास ते विभागीय प्रकल्प व्यवस्थापक एक प्रवास…सुवर्णा पगार ठरतात महीलांसाठी प्रेरणादाई व्यक्तीमत्व
सागर निकाळे निफाङ –
‘ज्ञान गंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठी, ज्यांचे शिक्षणाचे स्वप्न अपुर्ण राहिले त्यांच्यासाठी खरोखरच ज्ञान गंगा ठरत आहे. हे माझ्या बाबत शब्दश खरे ठरले आहे. सातवीपास होऊन शाळा सुटल्यानंतर वयाच्या 29 व्या वर्षी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत. पदवी, विविध संगणक कोर्स, पदवीत्तोर पदवी, एमएस डब्लु, अशी शिक्षणाची शिखरे पार करत एमपीएसी पर्यंत धडक दिली आणि आता शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (महाज्योती) नाशिक विभागाची प्रकल्प अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. हा सातवी पास ते एक अधिकारीपदाचा प्रवास केवळ आणि केवळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे पुर्ण करू शकले. यामुळे माझे विद्यापीठास कोटी कोटी धन्यवाद.
वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षापासून माझ्या नशिबी कुटुंबासाठी काम करण्याची वेळ आली. नियतीने बालपणच माझ्यापासून हिरावून घेतले होते. कधी 20 पैशांनी सोरटची पाने चिकटवली तर, कधी 500 रूपये महिना पगारावर अगरबत्तीच्या कारखान्यात काम केले, ते सगळे करून कसेबसे माझे शिक्षण सुरू होते. वडील पूर्ण दारूच्या आहारी गेलेले असल्याने. घरगाडा चालवणे आईला अशक्य होऊ लागले. आई मशीन काम करून आम्हा भावंडाना पोसत होती. पण शिक्षणाचा खर्च करणे तिला शक्य होत नव्हता. बाकी माझी भावंड ही त्या कारणाने जेमतेम 10/12वी पर्यंत शिकली. पण माझ्या नशिबात तर तेव्हढेही शिक्षण नव्हते. मुलगी ही प्रत्येक घरात जबाबदारी असते. असेच जबाबदारीचे ओझे हलके व्हावे म्हणून माझा विवाह वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी करून दिला. मी तेव्हा नुकतीच 7 वी त शिकत होती. ज्याच्याशी माझे लग्न झाले ते पदव्युत्तर पदवी मिळवलेले. ना कुठे मानसिक समतोल होता ना शारीरिक!!शहरातील वातावरणातून मी थेट ग्रामीण भागात फेकली गेली. तिथे कसेबसे 7 वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. ग्रामीण भागात सासर असल्याने शिक्षण तिथेच थांबले. थोर समाज सुधारकांची पार्श्वभूमी असलेल्या माझ्या महाराष्ट्र राज्यात माझाच बालविवाह झाला. ना मी शारीरिकदृष्ट्या परिपकव होते ना मानसिक दृष्ट्या सगळे कसे अनैसर्गिक होते. पण निसर्गाने स्त्रीला खरेच सोशिक जन्माला घातले आहे. कमी वयात लादलेले पत्नीत्व व मातृत्व पेलवणे मला खूप कठीण होते, पण सगळ्या संकटांवर मात करत मी संसाराचा गाडा ओढत होते. या काळात मला 3 अपत्य झाली 1 मुलगा व 2 मुली. पुढे जे दुःख आईच्या नशिबी तेच माझ्या नशिबी आले. नवराही व्यसनी निघाला. घरात वाद सुरू झाले. एकीकडे सासूचा सासुरवास व दिवसागणिक नवर्याचे वाढते दारूचे व्यसन या सगळ्यांनी माझे आयुष्य व्यापून गेले होते. मनातील तळमळ थांबत नव्हती. सासरी असतांना काही महिलांना एकत्र करून बचतगट स्थापन केला आणि पोषण आहार पुरविण्याचे काम सुरू केले. तर कधी इतरांच्या गोधड्या शिवून देत खर्च भागवू लागली.कर्ज काढून मिरची मसाल्याच्या गिरण्या घेतल्या असे एक ना अनेक उपायांनी संकटांवर मात करत होती.
हे सगळे सुरू असताना जे व्हायला नको होते तेच झाले. 11जुलै 2011 रोजी मला नवर्याने घरातून काढून दिले. यामुळे मी नाशिकला माहेरी आले. पण शिक्षण नाही तर काय करणार हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल असे वातावरणात माझ्या माहेरी नव्हते. त्यामुळे सुरवातीला खूप अडचणीना सामोरे जावे लागले.मुळात आई आणि वडील शिकलेले नव्हते ना आमच्या जवळच्या नातेवाईकांन मध्ये कोणी उच्च शिक्षित होते. त्यामुळे सगळ्यांना समजून सांगणे खूप जिकरीचे व्हायचे. एक तर आपली समाज प्रथा मुलगी एकदा माहेरी आली की तिला परक्या घरचे धन म्हणून हिनवले जाते. ज्या घरात ती जन्मला येते लहनची मोठी होते तेच घर तिला लग्नानंतर परके होते. हे सगळे करत असताना स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाची सुरवात केली घरा जवळच ज्ञानेश्वरी अभयसिक होती,तिथे ऍडमिशन घेतले तर शेजारच्या बायका आई ला म्हणायच्या हिचे काय वय आहे का शिकायचे. आणि शिकून काय मोठी ऑफिसर होणार आहे का?तर काही लोक हिनावयचे की आता तू निवृत्तीच्या वयात नोकरीला लागणार का?पण ह्या सगळ्या गोष्टींनवर मात करत मी माझा प्रवास सुरु ठेवला जेव्हा कधी खचल्यासारखे वाटले असेल तेव्हा मनाला उभारी मिळावी म्ह्णून काही लेखांकची पुस्तक वाचली. त्यात द मिरकल मॉर्निंग, द सिकरेट,मित्र जोडा आणि लोकांना प्रभावित करा असे अनेक पुस्तके वाचली ही सर्वच पुस्तक उत्तम आहे. त्याचसोबत संगीता उत्तम धायगुडे यांचे हुमान हे पुस्तक वाचले. लोकसत्ता वृत्तपत्र तर मला नियमाचा वाचन छंद झाला आहे. वृत्तपत्रात येणारे विविध लेखकांचे लेख मला उभारी देऊन गेले. स्वतःला एका वेगळ्या ढाच्यात पहायची सवय लावून घेतली त्याचा मला फार उपयोग झाला. ‘Everything is possible’ म्ह्णून स्वतःच्या मनला सांगत राहिली. मला नेहमी सेरेना विल्यमस एक वाक्य खूप महत्वाचे आहे, ते मला नेहमी ऊर्जा देते ‘ती म्हणते की स्पर्धा खेळताना आपले कष्ट प्रामाणिक पाहिजे मग जिंकणे अथवा हरणे याची भीती वाटत नाही’एक आई म्ह्णून मनाची घालमेल नेहमीच व्हायाची मूल तिकडे आणि मी इकडे पण स्वतःला एकच सांगितले होते आज नाहीतर कधीच नाही. समाजाची पर्वा करत बसली असती तर प्रगती साधता नसती आली. ज्या महाराष्ट्र राज्यात माझ्या सावित्रीमाईला पण समाजाने सोडले नाही तिने तरी कुठे तिचा प्रवास थांबवला मी तर तिची लेक आहे म्हणून पुढे चालत राहिली.पण प्रबळ इच्छा शक्ती असली की निसर्ग सुध्दा अनुकूल होतो असे म्हणतात. त्या प्रमाणेच मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची माहिती मिळाली. विद्यापीठातून 10/12 वी समकक्ष पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे पदवी साठी ऍडमिशन मिळते हे समजले. माझे अपूर्ण राहिलेले शिक्षणाचे स्वप्नांना पुन्हा नवे धुमारे फुटले. 2012 ला पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणास सुरवात केली. पण पुढे कोणत्या अभ्यासक्रमला ऍडमिशन घायचे या संभ्रमात होते.या कालावधीत एमएसीआयटी, टायपिंग, डीटीपी या संगणक कोर्सला ऍडमिशन घेतले. या परीक्षा पहिल्या प्रयत्ना मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. अशातच मला देशदूत या दैनिकात डीटीपी विभागात नोकरी मिळाली आणि तिथून माझ्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. येथे मला समजले की दैनिकात पत्रकार म्हणुन काम करायचे असेलतर पत्रकारितेची पदवी आवश्यक आहे. मुक्त विद्यापिठाचे एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारितेचे केंद्र समन्वयक प्रा. श्रीकांत सोनवणे यांना भेटून पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पत्रकारितेचा अभ्यासक्रम मी 2015 मध्ये 72.75% गुण मिळून कॉलेज मध्ये मुलांमध्ये द्वितीय व मुलींमध्ये प्रथम क्रमांकान उत्तीर्ण झाली. त्या कालावधीत मी देशदूत दैनिकातून लोकमत दैनिकात वितरण विभागात बॅक ऑफिस मध्ये रुजू झाली. कामाचे व्यवस्थापन उत्तम असल्याने माझी वर्णी लोकमतच्या इव्हेंट विभागात लागली. उत्तरोत्तर प्रगती होत होती.पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. पुन्हा एकदा माझ्या करिअरला वेगळे वळण लागले. सहकारी म्हणायचे तुझी आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती उत्तम आहे तू स्पर्धा परीक्षा का देत नाही. स्पर्धा परीक्षा विषयी मनात खूप कुतूहल होते. मग मी निर्णय घेतला की स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करू पण त्याच्या क्लासेससाठी पैसा माझ्याकडे नव्हता. सुरवातीला माझे मंगळसूत्र मोडून खासगी शिकवणी लावली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना खूप काही शिकायला मिळाले. आणि स्पर्धा परीक्षा साठी पूरक असा आपल्या विद्यापीठाचा एम ए पब्लिक सर्विसेसचा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम 71.63% प्रथम प्रयत्नात 2017 साली पूर्ण केला. मुक्त विद्यापीठाचाच रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या अभ्यासक्रमाचा डिप्लोमा 74.25%मार्क्सने 2014 साली उत्तीर्ण झाली. ह्या सगळ्या कालावधीत एमपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेस तीन वेळेस पात्र झाली. पण थोड्या गुणांनी माझी मुख्य परीक्षा गेली. प्रयत्नानाचा प्रवास सुरु होताच. ‘प्रयत्ने वाळूचे कण रागडीता तेलही गळे’ ह्या उक्ती प्रमाणे माझे कष्ट सुरूच होते. आणि ते आजही सुरूच आहेत. आपल्या विद्यापिठाच्या मुक्त शिक्षणप्रणली मुळे व स्वयंअध्ययन शिक्षण प्रणाली मुळे मला स्वतःला घडवता आले. त्याबरोबरच मला पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेता आले.आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देता आल्या. पुढे चालून मला ह्या शिक्षणाच्या जोरावर पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पत्रकारितेच्या(एमजेएमसी) अभ्यासक्रमास ऍडमिशन घेता आले.2021 या साली 63.64% मार्क्स घेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हे सर्व करत असताना ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची सावयत्त संस्था)येथे नाशिक विभाग प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली. तसेच सध्या मी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात (एमएसडब्लु) मास्टर ऑफ सोशल वर्क या अभ्यासक्रमास ऍडमिशन घेतले आहे. सदरील डिग्री प्रथम प्रयत्नात फर्स्ट क्लास आली त्यानंतर त्याच विषयात पेट आणि सेट उत्तीर्ण तसेच त्याच विषयात सध्या जळगाव विद्यापीठात phd सुरू आहे.अजूनही शिक्षणाची भूक भागली नाहीये शिक्षणाची ही ज्ञानगंगा अशीच प्रवाहित राहावी ही इच्छा आहे.
महाराष्ट्र राज्याचे आद्य समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान हे अतुल्य आहे. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत ज्ञानगंगा घरोघरी या वाक्याला सार्थ ठरवून शिक्षणाच्या चळवळीचा वारसा अविरतपणे यशस्वीरीत्या पुढे नेणारे माझे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे शतशः धन्यवाद!!
0
3
2
9
4
9