
0
3
2
1
2
3
अविवा इंडियाची नाशिकमधील नव्या आधुनिक शाखेसह प्रादेशिक व्याप्ती अधिक व्यापक
नाशिक– अविवा लाइफ इन्शुरन्स या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह खासगी जीवन विमा ब्रँडने नाशिकमधील आधुनिक शाखेच्या उद्घाटनासह महाराष्ट्रातील आपले अस्तित्व मजबूत केले आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूनंतर नाशिक हा अविवा इंडियाच्या ‘ब्रँच मॉडर्नायशेझन’ प्रकल्पाचा भाग असून त्याचे उद्दिष्ट ग्राहकानुभव अधिक चांगला करून जीवन विमा उपाययोजनांची व्याप्ती वाढवणे हे आहे.
नाशिक ही अविवा इंडियासाठी प्रमुख बाजारपेठ असून त्यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत व्यवसाय संधी सादरीकरण तसेच वेलनेस सल्लागारांच्या नेमणुकीत मोठी गुंतवणूक केली आहे. या नवीन शाखेचे उद्घाटन अविवा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. असित रथ करणार असून ही टियर २ शहरांमधील पहिली आधुनिकीकृत शाखा आहे. उर्वरित महाराष्ट्रात अशा अनेक शाखा येणार असून एक चांगली, ग्राहक केंद्री विमा सेवा त्यातून दिली जाईल.
नाशिकच्या शाखेत विविध सेवा दिल्या जातील. त्यात पॉलिसी सर्व्हिसिंग, नूतनीकरण आणि दावा सहकार्य तसेच अविवाचा सिग्नेचर प्रॉडक्ट पोर्टफोलिओही उपलब्ध असेल. ग्राहकांना अविवा सिग्नेचर ३डी टर्म प्लॅन- प्लॅटिनम, अविवा सिग्नेचर इन्क्रिजिंग इन्कम प्लॅन आणि अविवा सिग्नेचर इन्वेस्टमेंट प्लॅन- प्लॅटिनम तसेच इतर अनेक सर्वांगीण उपाययोजना जीवनविमा, निवृत्ती नियोजन आणि दीर्घकालीन बचतीसाठी मिळवता येतील. अविवा इंडिया आपल्या उत्पादनांद्वारे संरक्षणापासून प्रतिबंधाकडे जाण्यासाठीची आपली मोहीम चालवत आहे. त्यातून ते ग्राहकांना उद्याच्या आनंदी आणि सुदृढ भविष्यासाठी आज सुदृढ जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करत आहेत.
अविवाच्या जागतिक शाश्वतता दृष्टीकोनानुसार नाशिक शाखेची रचना ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधांसह तसेच पर्यावरणस्नेही कार्यान्वयन कार्यपद्धतींसह केली गेली आहे. त्यामुळे डिजिटल प्रथम ग्राहक सेवा उपाययोजना समाविष्ट करताना कार्बन पाया कमी केला गेला आहे.
या विस्ताराद्वारे अविवा इंडियाचे उद्दिष्ट नाशिकच्या आर्थिक वाढीला पाठबळ देताना आर्थिक सुरक्षा आणि वेलनेस उपाययोजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. या शाखेत अविवा वेलनेस सल्लागारांची संख्या वाढवली जाईल. ते विमा वितरणात आमूलाग्र बदल घडवून व्यक्ती व कुटुंबांना जीवनविमा अधिक सहजसाध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
अविवा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. असित रथ म्हणाले की, “अविवा इंडियामध्ये आम्ही भारतीय समाजाला सर्वोत्तम विमा उपाययोजना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. नाशिकमध्ये आमचा विस्तार ग्राहकांच्या बदलत्या गरजांच्या दृष्टीने वैयक्तिकीकृत उपाययोजना देण्यासाठी केला गेला आहे. वेलनेस सल्लागारांच्या वाढत्या नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही एक उत्तम, ग्राहककेंद्री वितरण मॉडेल तयार करत आहोत जे समाजाला उत्तम दर्जाच्या आर्थिक संरक्षणाची हमी देईल. डिजिटल नावीन्यपूर्णतेला तसेच कार्यक्षम मनुष्यबळाला चालना देऊन आम्ही प्रत्क व्यक्ती व कुटुंबासाठी विमा अधिक सहजसाध्य, पारदर्शक आणि सुलभ करण्याचे ध्येय समोर ठेवत आहोत.”
अविवा इंडियाच्या ब्रँच नेटवर्कमध्ये झालेली ही नवीन भर कंपनीच्या वाढ, नावीन्यपूर्णता आणि ग्राहक प्रथम दृष्टीकोनाच्या दीर्घकालीन स्वप्नाला अधोरेखित करते. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय घरांसाठी आर्थिक सुरक्षा हे सत्य होईल.
0
3
2
1
2
3