
0
3
2
1
2
3
मनमाडला भिखु संघाच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन
मुक्ताराम बागुल, नांदगाव…
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अखिल भारतीय भिखु संघाच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पुणह अभिवादन करून त्रिशरण आणि पंचशील घेऊन केली. हे आंदोलन बौद्ध संस्कृतीच्या जागृतीसाठी व महाबोधी महावीराच्या व्यवस्थापनात बदल करण्यासाठी सुरू केले गेले आहे.
बुद्धगया येथील महाबोधी महावीहाराचे व्यवस्थापन, 1949 च्या व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबली महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती घेण्यात यावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. बुद्धगया येथे सुरू झालेल्या भिखु संघाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे धरणे आंदोलन भारतभरातील बौद्धांच्या सहभागाने घेतले गेली आहे.
या आंदोलनात प्रामुख्याने भंते दिपंकर, भंते बोधीपाल, भंते श्रद्धानंद व मनमाड शहरातील बौद्धाचारी व भीम अनुयायी या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध धर्माचे अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सहभागी झाले होते. त्यांच्या एकतेने आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे धरणे आंदोलन फक्त एक संघर्ष नाही तर बौद्ध संस्कृतीच्या जागृतीसाठी व धर्माच्या मूलभूत हक्कांचा संरक्षण करण्यासाठीचे मजबूत पाऊल आहे. यामुळे बौद्ध समाजाचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होत आहे. या आंदोलनामुळे बौद्ध समाजाच्या मागण्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी सरकार व इतर संस्थांना जबाबदारी घ्यावी लागेल. याशिवाय यामुळे बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन व संरक्षण करण्यासाठीची मागणी पुढे आली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांच्या पालनेसाठी व बौद्ध संस्कृतीच्या जागृतीसाठी हे धरणे आंदोलन एक महत्त्वाची पायरी आहे. यामुळे बौद्ध समाजाच्या आवाजाला जास्तीत जास्त शक्ती मिळणार आहे.”बौद्ध धर्माची जागृती-भारताची जागृती”
0
3
2
1
2
3