संपादकीय
शांततामय नागपूरला हिंसेचे गालबोट!

0
3
2
1
2
3
शांततामय नागपूरला हिंसेचे गालबोट!
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.या आंदोलनात मुस्लिम प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप करीत आंदोलकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली.परंतु चुकीची अफवा पसरल्याने महाल येथे तनाव वाढला व अशांतता निर्माण झाली.अशा परिस्थितीत पोलिस विभागाने दोन्ही गटांची समजूत घालून परिस्थिती शांत केली.परंतु रात्री अचानक तनाव वाढला व दोन गटांमध्ये दगडफेक सुरू झाली हा प्रकार एवढा टोकाला गेला की याचे रूपांतर हिंसक झाले व जाळपोळची घटना सुरू झाली.या घटनेमध्ये असामाजिक तत्वांचा समावेश असल्याचे स्पष्ट दिसून येते.देशातील नागपूर शहर हे शांततेच प्रतीक मानल्या जाते.याठीकाणी सर्वंच धर्माचे लोक एकोप्याने आणि आनंदाने रहातात.जेवढे सन राज्याच्या किंवा देशाच्या इतर भागात होत नसेल तेवढे सन व सांस्कृतिक कार्यक्रम नागपूरात होतात.परंतु राज्यात सध्याच्या परिस्थितीत औरंगाबादच्या कबरीचा वाद एवढा विकोपाला पोहोचला की शांततामय नागपूरमध्ये जाळपोळीची घटना दिसून आली व हिंसेचे गालबोट लागले.अशा हिंसक घटना स्थानिक समाज किंवा धर्माचे लोक कधीच करीत नाही.त्यामुळे १७ मार्चला २०२५ ला झालेली जाळपोळ व हिंसक वळण यात असामाजिक तत्वांचा सुनियोजित हात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दुःखद बाब म्हणजे जे आपले संरक्षक व रक्षणकर्ते पोलिस विभाग व सुरक्षा विभाग आहेत यांच्यावर सरळ हल्ला करने व दगडफेक करने ही बाब पुर्व नियोजित असल्याची या संपूर्ण घटनेवरून दिसून येते.जे कोणीही असेल ज्यांनी-सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न केला व सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला अशा सर्वांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे.दुख:द बाब म्हणजे या हिंसाचारात ३३ पोलिस जखमी झाले ज्यात ३ उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत.एका अधिकाऱ्यांवर तर कुह्राडीने हल्ला केला व यात पाच नागरिक सुध्दा जखमी झाले ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.महत्वाचा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झाला. औरंगजेबाच्या कबरी बद्दल राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.याची ठीनगी संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू वनव्यासारखी पसरायला लागली आणि औरंगजेबाची कबर हटली पाहिजे यासाठी महाराष्ट्रात लोकशाहीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली.परंतु ज्याठिकाणी कोणीही एकीन करू शकत नाही अशा शांततामय व सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये दिनांक १७ मार्च २०२५ सोमवारला हिंसेच गालबोट लागले आणि हिंसा एवढी विकोपाला गेली की असामाजिक तत्वांनी दगडफेक व जाळपोळ करून नागपूरची शांतता भंग केली ही नागपूरसाठी अत्यंत दुःखद व चिंताजनक बाब आहे.नागपूर ही राज्याची उपराजधानी आहेच सोबतच देशातील सुरक्षित ठिकाण म्हणून नागपूरची गणना संपूर्ण भारतात होते व भारताचा केंद्र बिंदू सुध्दा आहे.कारण याठिकाणी संघ कार्यालयात, दिक्षा भुमि,ताजुद्दीनबाबांचा दर्गा,चर्च,गुरूव्दारा इत्यादी अनेक मोठमोठी धार्मिक व सामाजिक संस्थाने व स्थळे आहेत. प्रत्येकांच्या सनाला अनेक धर्मांचे लोक आवर्जून सहभागी होतात म्हणूनच नागपूरला शांततेचे शहर म्हणून संपूर्ण भारतात ओळख आहे.१७ मार्चच्या हिंसक प्रकारामुळे शांततामय नागपूरला गालबोट लागल्याचे दिसून आले.या घटनेवरून स्पष्ट दिसून येते की नागपूरला हिंसेमध्ये झोकण्याचे काम असामाजिक तत्वांचे कारस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे.कारण देशातील कोणताही व्यक्ती असो जो व्यक्ती देशाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर हल्ला करतो तो हल्ला संपूर्ण सुरक्षा विभावर,राज्यावर व देशावर झाल्याचे गृहित धरल्या जाते त्या पध्दतीने सुरक्षा विभागाची कठोर कारवाई सुरू आहे. अशा समाजकंटकांना सुरक्षा विभाग कदापि माफ करणार नाही.त्यापध्दती पोलिस विभागाची व सुरक्षा विभागाची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे.पोलीस विभागाने शांतता निर्माण करण्यासाठी मोठ्या संय्यमतेने काम केले व अनेक जखमा व वेदना सहन केल्या परंतु समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेऊन पोलीस विभागालाच टारगेट बनवून त्यांच्यावरच हल्ला करत दगडफेक,जाळपोळ व हिंसेचे वातावरण निर्माण केले.तरीही सुरक्षा विभाग समाजाच्या रक्षणासाठी डगमगला नाही व समाजाची ढाल बनून उभे राहिले व संपूर्ण स्थीती नियंत्रणात आणुन शांतता निर्माण केली.याकरीता पोलिस विभाग व सुरक्षा विभागाला माझा कोटी कोटी सलाम! राज्यात औरंगजेबाच्या कबरी बद्दलचा जो मुद्दा आहे.याकरीता महाराष्ट्रातील ४८ खासदार व २८८ आमदारांनी एकत्र बसून सोडवावा किंवा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने कबर हटवावी. असे जर एकमताने होत असेल तर याचे स्वागत सर्वांनीच केले पाहिजे. औंरगजेब क्रुर होता त्यानी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली.सोबतच त्यांनी आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीची हत्या करून गादी हस्तगत केली व बादशहा बनला.त्यामुळे राज्यातील किंवा देशातील कोणत्याही समाजाजवळ औरंगजेबाबद्दल आदर नसावा.यासाठी सरकारने व प्रशासनाने औरंगाबादच्या कबरीच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ज्याचे स्वागत सर्वच स्तरातून झाले पाहिजे.परंतु राज्यातील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर वक्तव्य टाळले पाहिजे जेणेकरून राज्यात कुठेही शांतता भंग होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.कारण ज्याप्रमाणे शांतता प्रस्थापित करणे सुरक्षा विभागाचे कर्तव्य आहे तेवढेच कर्तव्य राजकीय पुढाऱ्यांचे सुध्दा आहे असे मला वाटते.नागपूरच्या संपूर्ण समाज बांधवांना विनंती करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व शांतता बाळगून पोलिस विभागाला संपूर्ण सहकार्य करा हिच संपूर्ण धर्माकडुन व समाजबांधवांकडुन अपेक्षा जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
0
3
2
1
2
3