कृषीवार्तासामाजिक
उमेदच्या २८ बचत गटामुळे महिलांचे सक्षमीकरण

0
3
2
1
2
3
शेनीतच्या कमलताई आरोटेंमुळे महिलांना मिळाले जीवन जगण्याचे बळ; उमेदच्या २८ बचत गटामुळे महिलांचे सक्षमीकरण
इगतपुरी ( प्रतिनिधी ) समाजात अनेक स्त्रिया सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा यांच्या बंधनात अडकून मागे पडतांना दिसतात मात्र हे चित्र बदलण्यासाठी शेनीतच्या उमेदच्या आयसीआरपी कमलताई भावराव आरोटे या रणरागिणीने पुढाकार घेतल्यामुळे महिलांचा सर्वागीण विकास सक्षमीकरण झाले असून रोजगार मिळण्यास मोठी मदत झाली आहे. २८ बचत गटांच्या माध्यमातून तीनशे महिलांना जीवन जगण्याचे बळ मिळाले आहे. फक्त आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या कमल आरोटे यांनी महिलांना एकत्र करून इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाच्या माध्यमातून २८ महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन जगण्यासाठी रोजगार मिळवून दिल्याने त्यांचे कौतुक होत असते. महिलांचे बचत गट तयार झाल्याने सक्षमीकरण होत आहे. महिला ग्रामसंघाने राबविलेल्या जनजागृती अभियानाला चांगलाच प्रतिसाद असून गावात श्रमदानातून साफसफाई महिला गट करतात. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. बचत गट व उमेद कशाला म्हणतात हे कुणाला माहीत नव्हते मात्र बचत गटात आल्यावर महिला सक्षम झाल्या असून त्यांना कमलताई भावराव आरोटे यांनी बचत गटाचे महत्व पटवून दिले. ज्या महिलांना घर व प्रपंच सोडून काही माहिती नव्हती त्या महिला आज सक्षम झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्याने त्यातील काही महिला अनेक उद्योग व्यवसाय, करीत आहे. कमलताई आरोटे यांनी एलआरपी व जीपीटीपी आराखडा अंतर्गत प्रशिक्षण घेऊन महिलांपर्यंत माहिती पोहचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पूर्वी आम्हा महिलांना वाटायचं की गावाचा विकास कारभार हा फक्त पुरुषानेच पाहायचा असतो उमेदमध्ये सहभागी झाल्यावर कळले गावचा विकास फक्त महिलाच करू शकतात असे त्यांनी सांगितले. सर्व बचत गटांना मार्गदर्शन उमेदचे बचत गटाचे बी एम एम उज्वल सोनवणे, आयबीसीबी दीपाली वाघ, सीसी आवारे, मोनाली नाठे, आयसीआरपी भारती नाठे, ग्रामसेवक संदीप नेटके, सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील ग्रामस्थ, ग्रामसंघाचे पदाधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते. बचत गटाबरोबरच कमलाताई आरोटे उत्तम शेती पण करतात. उमेद महिला बचत गटाचे एकट्या कमलाताईं नेतृत्व करतात. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी बचत गट तयार करणार असल्याचे कमलताईने सांगितले. आई वडिलांच्या संस्कारातून तसेच माझे पती भावराव आनाजी आरोटे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला एक पाऊल नव्हे दहा पाऊल पुढे जाण्यासाठी उमेदने शिकवलं महिलांनी हार न मानता जीवन जगण्यासाठी मार्ग काढावा असे त्यांनी सांगितले.
0
3
2
1
2
3