Breaking
आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगावला धरणे आंदोलन

0 3 2 1 2 1

नांदगाव, दि. 4 (मुक्ताराम बागुल) :-

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील महत्त्वाची जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित चालू करणे व राजाची सर्व शेतकऱ्यांनी कर्ज माफ करणे, मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन संमत सूर्यवंशी यांच्या हत्याप्रकरणी आरोपी व कठोर कारवाई करण्याबाबत नांदगाव तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश बनभेरु यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू केले.
महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली होती. मात्र महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 20 मार्च 2025 रोजी च्या बैठकीतील निर्णयानुसार ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच या योजनेतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे चार जोखीम घटक वगळण्यात आले आहे. त्यात (१) प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे (२) हंगामाच्या मध्यभागी उद्भवणारी प्रतिकूल परिस्थितीत (३) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (४) काढणी पश्चात नुकसान भरपाई आदी घटक वगवळण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री पीक योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाच्या नुकसानीपासून संरक्षण देणे आणि त्यांचा आर्थिक स्थर अबाधित ठेवणे हा आहे. मात्र वरील महत्वाचे चार घटक योजनेतून वगळले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. शासनाकडून सांगण्यात येते की पिक विमा घोटाळ्यामुळे ही योजना बंद केली जात आहे. मात्र काही ठराविक जिल्ह्यामध्ये घोटाळे झाले असतील म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवून योग्य नाही. याशिवाय विधानसभा निवडणुकीवेळी विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची आश्वासन दिले होते. परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलण्यात आले आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न कमी होत असताना, अवेळी पडणारा पाऊस, त्यांच्या मालाला मिळणारा कमी बाजार भाव यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. तरी महाराष्ट्र शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पिक योजना त्वरित पूर्ववत सुरू करावी सर्व शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन उभारेल
तसेच मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी., 9 डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्सा जोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण आत्या करण्यात आली होती. तसेच 3 मार्चच्या रात्री या कृती चे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या फोटोमध्ये त्यांना अमानुष मारहाण करताना व हसताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी हे फोटो चार्ज शीटमध्ये चोरले आहेत. तसेच 15 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षीय कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. भारतीय राज्यघटनेच्या अपमानाच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर कोठडीतच त्यांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या घटकामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गुन्हेगार बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत आणि सामान्य जनतेच्या सुरक्षतेतेवर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटनाबाबत न्याय मिळावा म्हणून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल व होणाऱ्या परिणामांना संपूर्णतः शासन जबाबदार असेल असे. नांदगाव तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदरच्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल बनफेरु जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष व विधी विभाग, मिथुन पवार जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, राहुल जाधव जिल्हा उपसचिव, सचिन आहेर तालुकाध्यक्ष जनहित कक्ष, विजय पवार, गोकुळ पवार आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे