Breaking
शासकीय

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे 32 प्रस्ताव मंजूर

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत मंजुरी

0 3 2 1 2 3

नाशिक, दिनांक 14 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : राजीव गांधी अपघात सानुग्रह योजना शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयाकडून अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी राबवली जाते. या योजनेच्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत प्राप्त एकूण ३२ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली.

या बैठकीस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, योजना शिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांच्यासह समिती सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते.

अपघातामध्ये मयत झालेले विद्यार्थी 26 व शस्त्रक्रिया करून उपचार घेण्यात आलेले विद्यार्थी 6 असे एकूण 32 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यासाठी रक्कम रुपये ४२ लाख ३६ हजार मदत देण्यात येणार आहे.

अशी आहे योजना
विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीकोनातून तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी अपघात योजना 1 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासननिर्णयानुसार नियमित स्वरूपात राबविण्यात येत आहे. शासन निर्णय 21 जून 2022 नुसार सुधारित शासननिर्णयानुसार लाभार्थी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत.

लाभार्थी निवडीचे निकष
1.विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू- रूपये 1लाख 50 हजार
2.अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव/ 2 डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा) – रूपये 1 लाख
3.अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( 1 अवयव/1 डोळा) कायम निकामी- रूपये 75 हजार
4.विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास- प्रत्यक्ष हॉस्पिटल खर्च किंवा जास्तीत जास्त रूपये 1 लाख.
5.विद्यार्थी आजारी पडून, सर्प दंशाने किंवा पोहतांना मृत्यू झाल्यास- रूपये 1 लाख 50 हजार
6.विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेत खेळतांना जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज पडून)- प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख

वरीलप्रमाणे समितीसमोर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबादारी इयत्ता 1 ली ते 8वी च्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची आहे. तसेच या योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास विद्यार्थ्याचे वडील, विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण व पालक अशी आहे.
00000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे