
0
3
2
9
4
9
सातपूर: जनविकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव यांची गेल्या दहा बारा वर्षांपासून समाज सेवा कार्याने ओळख झाली.विद्यार्थी गुणगौरव, निवृत्ती नंतर सत्कार, जेष्ठ नागरिक वाढदिवस, छत्री रेनकोट वाटप, विद्यार्थी शालेय साहित्य वाटप, अंध अपंग,गरजुंना मदत,शाळेचे ऍडमिशन, रोजगार मेळावा, शाळेसाठी पाण्याच्या टाकी वाटप,अन्नदान, कोणाची निवड, वाचनालय चालवत आहे.कुणी सरकारी नोकरीवर,कुठे काही निवड झाली तर आवर्जुन शाबासकी ची थाप असे अनेक उपक्रम ते राबवत आहे.कोठेही यशस्वी होण्यासाठी चार गोष्टी एक अज्ञान नसाव,आळस नसावा,गर्व नसावा व वाईटाची संगत नसावी.बाळासाहेब जाधव हे स्वतः अनुभवी व हुशार व तत्पर,सर्वांशी मिळून मिसळून विनय,आणि संगत सज्जनाचीआहे. सुखी समृद्ध होण्यासाठी एकच पंथ,संत,ग्रंथ,कांत,सेवा धारी व नामधारक असावे. बाळासाहेबांनी आपल्या जीवनात हे सर्व तत्व अंगीकारलेले आहेत.म्हणुन श्री बाळासाहेब जाधव व सौ.सरलाताई जाधव यांचे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद आहे असे विचार अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी व्यक्त केले.
मुळचे वडाळीभोई येथील पण गेली चाळीस वर्षे अशोकनगर येथे रहिवासी असणारे श्री बाळासाहेब जाधव यांनी नुकताच भाजपात प्रवेश करुन आज त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पच्छिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यकुशल आमदार मा.सौ.सिमाताई महेश हिरे यांचें शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर व्यासपीठावरुन बोलत होते.श्री बाळासाहेब जाधव व सरलाताई जाधव यांचे हस्ते श्री महेश हिरे व सौ.सिमाताई हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर भाजप प्रदेश पदाधिकारी मा.श्री महेश भाऊ हिरे,श्री रविंद्र जोशी, श्री राजेन्द्र दराडे,छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व तरुण तडफदार झुंजार नेते मा.श्री करण गायकर, सातपूर मंडल अध्यक्ष श्री नारायण जाधव,भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री किसनराव विधाते,नाशिक शहर कमिटीचे श्री भगवान काकड,शहर कमिटीचे श्री रामहरी संभेराव,मा.नगरसेविका सौ.हेमलता कांडेकर,मा . नगरसेविका सौ ज्योती ताई शिंदे,सौ माधुरी बोलकर, रश्मीताई हिरे,श्री समाधान देवरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री किसनराव खताळे,श्री संतोष नाना वाघचौरे,श्री बाळासाहेब पोरजे श्री शिवाजी शहाणे,श्रीइंद्रभान आप्पा सांगळे, श्री हेमंत नागरे,श्री रविंद्र मालुंजकर बाळासाहेब भोजने,गणेश मौले, तुषार भंदुरे,शरद काळे,उदय बोरसे,रवी भोर, गुलाब माळी,सागर वैष्णव, बजरंग शिंदे, श्री पांडुरंग खोटरे,सुनिल मेहेत्रे,श्री प्रेम दशरथ पाटील ,नरेंद्र उगले,जीम चे श्री दया गजभार सर,विनोद निकम,बाळु हिरे,किरण पाटोळे, सौ.मंगला खोटरे,पद्मा राऊत, निलेश जोशी, तुषार भंदुरे, तुषार पवार,सुरज तांबे, महेश जाधव,कल्पना पाटोळे, ओम काकड सौ मनीषा गांगुर्डे जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी तांबे, विवेकजी हासे, अरुण लांडगे, उदय जी बोरसे, बादशाह आरोटे, पद्माकर सोनवणे, रामकृष्ण जाधव, महेश शेळके, उमेश ठोंबरे, वसंत शिंदे, दिनकर जाधव, तुषार जाधव, सौ सोलोचना गांगुर्डे, सौ जया सोनवणे,सौ सारिका चव्हाण, सौ रूपाली भिसे, सौ कुसुम माने, सौ रोहिणी जोशी, सौ संगीता भोसले, सौ पाटील ताई, सुरेखा सिन्हा, शुक्लाताई, सौ वीर तसेच बहुसंख्य महिला पुरुष बालगोपाल कार्यक्रमास उपस्थित होते.
0
3
2
9
4
9