अपघात
पिकअप दरीत कोसळून चार जण ठार, १८जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

0
3
2
1
2
3
नवस पूर्ती करून परतीचा प्रवास करीत असताना, कन्नड घाटात पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने, पिकअप दरीत कोसळून चार जण ठार, १८जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक. पोतोंडा गावावर शोककळा
यशवंतराव ताडगे,
चाळीसगाव प्रतिनिधी:- कन्नड ते चाळीसगाव महामार्ग दरम्यान असलेल्या औट्रम (कन्नड) घाटामध्ये शेवटच्या वळणचा टप्पा पार करीत असताना, पिकअप गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घाटातील नालीत कोसळून , तीन जणांचा जागीच मृत्यू तर एकाचा दवाखान्यात मृत्यू झाला.तर १८ प्रवाशी जखमी झाले असून तिघां जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. दिनांक २ एप्रिल बुधवार रोजी रात्री ठीक ७.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
या घटनेचे वृत्त चाळीसगाव शहरात व पातोंडा, पोहरा, वाडे, गुढे गावात पोहचता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. या घटनेने महाजन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोतोंडे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा, पोहरा, भडगाव, वाडे – गुढे पाचोरा तालुक्यातील प्रवाशी असल्याचे कळते. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू करून, जखमींना पुढील उपचारार्थ चाळीसगाव येथील सरकारी ट्रॉमा केअर सेंटर येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी मंदार करंबेळकर यांनी तातडीने तपासणी करून उपचार सुरू केले.
तर काही जखमीं रुग्णाला शहरातील वाय. पी.पाटील व मातोश्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नवस पूर्ती फेडण्यासाठी श्रीरामपूर गेलेले राजेंद्र भीमराव माळी वय वर्ष ४५ , अनिकेत रमेश माळी, वय वर्ष १७, सुनिता रमेश माळी वय वर्ष ३८, गौरव धर्मा माळी वय वर्ष १७ , सावित्रीबाई मधुकर माळी वय वर्षे ६५, नाना दामू माळी, संदीप संपत माळी, हडसन पहान ता . पाचोरा, निंबा काळू महाजन वय वर्षे ६५, रा. पोहरे, भिमराव भगवान महाजन, वय वर्षे ३०रा. पातोंडा ,नाना संतोष माळी वय वर्षे ३० पिकअप चालक रा. पातोंडा राहुल लक्ष्मण महाजन रा. गुढे हे मालवाहतूक गाडी पिकअपने परतीचा प्रवास करीत असताना कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या औट्रम घाटात चालकाचे शेवटच्या वळण रस्त्यावर गाडीवरचा ताबा सुटल्याने पिक अप दर्ग्याच्या समोरील नालीत कोसळली. डोंगर कठड्याला ठोकली गेली.या अपघातात राहुल लक्ष्मण महाजन रा. गुढे नाना दामू माळी, सावित्रीबाई मधुकर माळी वय वर्षे ६५ दोघे ही रा.पातोंडे , हे तिघे जागीच ठार झाले .तर एका जखमीचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे कळते.
मालवाहतूक गाडी क्रमांक एम. एच.१९बी . एम. ३९४७ ही पिकअप गाडी कन्नडहून चाळीसगाव कडे येत असताना, चाळीसगाव शहरापासून जवळपास ७ ते ८ किमी अंतर असलेल्या औट्रम ( कन्नड) घाट उतरताना शेवटच्या घाट वळण रस्त्यावर पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडले.
या घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच महामार्ग पोलिस उपनिरिक्षक शशिकांत पाटील, हेडकॉन्स्टेबल थोरात, बापू पाटील, सुशिल पाटील, जितू माळी जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.
0
3
2
1
2
3