घरातून बेपत्ता दोन तरुणींचे मृतदेह आढळले भाम धरणात

इगतपुरी –
दिनांक 30 जानेवारीपासून घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात सोमवारी दुपारी आढळले. मुली बेपत्ता झाल्याची तक्रार घोटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली होती. तेव्हापासून या मुलींचा शोध सुरू होता. या मुलींचा शोध सापडूनही लागत नव्हता त्यामुळे मुलींच्या आई-वडिलांनी अन्नपाणी सोडले होते. इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरात असलेल्या ठाकूरवाडी येथील भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेट मध्ये दोन बेपत्ता तरुणीचे मृतदेह सापडले. कांचनवाडी परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी (19) आणि सरिता काळू भगत (18) असे या मुलींची नावे आहेत. सोमवारी दुपारी या तरुणींचे मृतदेह गुरुदेव गोरख गळंदे यांना धरणाच्या आउटलेट येथे आढळले. त्यांनी याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेनवड बुद्रुकचे सरपंच कैलास कडू रमेश गांगड देविदास केवारे अंकुश संतु भगत ज्ञानेश्वर काळू गिळंदे आणि मदर बिन्नर यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून या तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून संविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.