Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रशैक्षणिकसत्कारसामाजिक

सर्वतीर्थ टाकेदची १७ वर्षीय प्रांजल गोसावीची नर्मदा परिक्रमा पूर्ण

0 3 2 1 2 3

सर्वतीर्थ टाकेदची १७ वर्षीय प्रांजल गोसावीची नर्मदा परिक्रमा पूर्ण

शरद लोहकरे, लासलगाव…

सर्वतीर्थ टाकेद येथील १७ वर्षीय प्रांजल गोसावी विजयादशमी पासून नर्मदा परिक्रमा करत आहे. दि.४ फेब्रु.रोजी नर्मदा जयंतीच्या दिवशी ओंकारेश्वर येथे ओंकारेश्वरास जल अर्पण करून नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहे.

   नाशिक जिल्ह्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील प्रांजल गोसावी व कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील प्रतीक्षा अंबादास गवांदे

या दोघी मैत्रीणींनी नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प घरातील मंडळींना सांगितला. प्रांजलचे कमी वय, चार हजार कि.मी. त्यातच खडतर असा नर्मदा परिक्रमेचा पायी प्रवास, त्यामुळे घरातून त्यांना तीव्र विरोध झाला. मात्र त्यांची तीव्र इच्छाशक्ती, श्रद्दा आणि दोन तीन महिन्यांच्या हट्टापुढे घरातील मंडळींनी माघार घेत त्यांना परवानगी दिली. त्यांच्या गुरू ह.भ.प. कावेरीताई घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची परिक्रमा सुरु झाली. प्रतिक्षाच्या घरचे वातावरण धार्मिक असून ती किर्तन ही करते. सुर्योदय झाला की, प्रवासाला निघायचे. नर्मदेच्या तीरावर जेथे आश्रम, मंदीर असतील तिथे अन्न ग्रहण करायचे. सायंकाळी ५ वाजता जेथे जागा मिळेल तेथे मुक्काम करायचा हा त्या दोघींचा नित्यक्रम असून दररोज २५ ते ३० कि.मी.चा प्रवास त्या दोघी करतात. नदीच्या तीरावरील आश्रम, मंदीर, गावे येथील गावकरी खुप प्रेमळ असून आस्थेने चौकशी करतात, त्यामुळे कुठलाही थकवा जाणवत नाही असे दोघी सांगतात.

◆ प्रांजल गोसावी ही फेब्रुवारीतील दुसऱ्या आठवड्यात बारावीची परीक्षा देणार आहे. तरद हीगावची प्रतीक्षा गवांदे रसायनशास्त्राची पदवीधर असून तीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे राहून पदवी प्राप्त केली आहे. प्रतिक्षाला नोकरी मध्ये स्वारस्य नसून येथून पुढील जीवन प्रभू सेवेस अर्पण करण्याचा तिचा मानस आहे तर प्रांजलनेही तीच वाट धरली आहे.

◆ नर्मदा नदीला धार्मिक अधिष्ठान असून पाणी खुप स्वच्छ आहे. नर्मदा नदीतीरावर सुमारे अडुसष्ट हजार तिर्थक्षेत्र असून सर्व ठिकाणी खुप प्रेमळ लोक आहेत. त्यामुळे आमची परीक्रमा खुपच आनंददायी होत आहे. – प्रतिक्षा गवांदे

◆ इतक्या लहान वयात परीक्रमा करण्याचे भाग्य मिळत आहे, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. घरातील मंडळींचा विरोध त्यातच बारावीची परीक्षा तोंडावर असली तरीही मी  परीक्रमा करण्याचा निर्धार करत पूर्ण केला. परीक्रमा पुर्ण झाल्यावर बारावीची परीक्षा देखील चांगल्या मार्काने पास होणार आहे.- प्रांजल गोसावी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे