Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

राज्यातील सर्व शाळांसाठी एकाच वेळी वार्षिक परीक्षा , संकलित चाचणी-२चे वेळापत्रक जाहीर

0 3 2 1 2 3

यशवंतराव ताडगे पळाशी /प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी-२ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत सत्र २ च्या परीक्षा पार पडणार आहेत. तसेच, राज्यातील सर्व शाळांमध्ये या परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत. या निर्णयाबदल शिक्षक संघटना नाराज झाल्याचे बोलले जाते. कमी कालावधीत निकाल करावा लागणार असल्याचे अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यावर येणार असल्याने शिक्षक मंडळी नाराज असल्याचे दिसून येत आहे. निर्णयाचा फेर विचार करून वेळापत्रक बदलले जावे अशी मागणी होत आहे.
इयत्ता तिसरी ते नववीसाठी तीन मूल्यमापन चाचण्या
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
१) पायाभूत चाचणी
२) संकलित मूल्यमापन चाचणी-१
३) संकलित मूल्यमापन चाचणी-२

चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी संकलित मूल्यमापन-२ शाळा स्तरावर आयोजित केला जाणार आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षांचे आयोजन करावे, तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात याव्यात.असे सूचित करण्यात आले आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुविधा
शिक्षण परिषदेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, एखादा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी गैरहजर असेल, तर तो शाळेत उपस्थित झाल्यावर त्याची परीक्षा घ्यावी.असे निर्देश देण्यात आले आहे.

निकाल व उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक
विद्यार्थीचा वार्षिक निकाल हा पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी जाहीर केला जाईल. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२५ रोजी ध्वजारोहणानंतर निकाल जाहीर करण्यात यावा.

उन्हाळी सुट्टी: २ मे २०२५ पासून सुरू होईल.

प्रशासनाची जबाबदारी
संकलित चाचणी-२ च्या आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची असेल. संबंधित शाळांनी परीक्षांचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी.

वेळापत्रकात बदल करायचा असल्यास राज्य परिषदेची परवानगी आवश्यकराहील असे सूचित करण्यात आले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक स्तरावर वेळापत्रक बदलण्याची आवश्यकता असल्यास शिक्षण अधिकाऱ्यांनी MSCERT, पुणे यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांच्या शाळांना हा निर्णय लागू होणार नाहीत.

*इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले! ५ ते २३ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे.

परीक्षा कालावधी: ५ ते २३ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी ८ ते ११ निकाल जाहीर: १ मे २०२५
फेरपरीक्षा: जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी

✍️ परीक्षेनंतरही शाळा बंधनकारक!
यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येत नसत. मात्र, यंदा २५ एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाची जबाबदारी:
इयत्ता ५ वी ते ८ वीच्या उत्तरपत्रिका जतन कराव्या लागणार, आहे.त्या उत्तरपत्रिकांची डायट किंवा शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाऊ शकते.

परीक्षा कोणत्या दिवशी, कोणता विषय?

* ५ एप्रिल – नववीचा मराठी विषयाचा पेपर
* ७ एप्रिल – नववीचा इंग्रजी विषयाचा पेपर
* ८ एप्रिल – पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी (पॅटर्न) परीक्षा
* ९ एप्रिल – सहावीचा गणित, आठवी व नववीचा इंग्रजी (पॅटर्न) पेपर
* ११ एप्रिल – सहावी व नववीचा इंग्रजी पेपर, आठवीचा गणित (पॅटर्न) पेपर
* १२ एप्रिल – सर्व वर्गांसाठी इंग्रजी, हिंदी आणि गणित परीक्षा
* १५ एप्रिल – सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताचा पेपर
* १६ एप्रिल – सहावीच्या समाजशास्त्र, आठवीच्या गणित आणि नववीच्या विज्ञान भाग-१ ची परीक्षा
* १७ एप्रिल – पाचवीच्या परिसर अभ्यास, सहावीच्या चित्रकला, आठवीच्या हिंदी आणि नववीच्या विज्ञान भाग-२ ची परीक्षा
* १९ एप्रिल – सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या विज्ञान, नववीच्या गणित भाग-२ (पॅटर्न) परीक्षा
* २१ एप्रिल – सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या समाजशास्त्र, नववीच्या हिंदी विषयाची परीक्षा
* २२ एप्रिल – पाचवी व सहावीच्या शालेय शिक्षण, आठवीच्या चित्रकला, नववीच्या इतिहासाची परीक्षा
* २३ एप्रिल – सहावीच्या इंग्रजी (पॅटर्न), आठवीच्या शालेय शिक्षण, नववीच्या भूगोलाची परीक्षा

परीक्षेचा निकाल १ मे रोजी लावावा लागणार असल्याने शिक्षकांना त्वरित उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनपूर्वी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
मुलांना परीक्षा लवकर झाल्या असत्या तर त्यांना मामाच्या, नातेवाईकांच्या घरी जाण्याची आस लागून असते, लग्न, वाढदिवस समारंभ लाही दांडी मारावी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मे महिन्यात तच मामाच्या गावी जावे लागणार आहे. त्यामुळे अगोदर परीक्षा घेतल्या गेल्या असत्या तर त्यांना मामाच्या गावी व लग्न समारंभला उपस्थित राहता आले असते. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हा निर्णय बदलून लवकर परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे