टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि ओहमियम यांच्यात भारतात स्केलेबल हायड्रोजन-आधारित ऊर्जा उपाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
या भागीदारीचा उद्देश भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांशी आणि हायड्रोजन समाज साकार करण्याच्या टोयोटाच्या उपक्रमांशी सुसंगत राहून, एकत्रित ग्रीन हायड्रोजनवर चालणारे ऊर्जा उपाय विकसित करणे आहे.

नाशिक: कार्बन न्यूट्रॅलिटी आणि स्वच्छ ऊर्जा नवकल्पनांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज बेंगळुरूस्थित ओहमियम इंटरनॅशनल या आघाडीच्या पीईएम हायड्रोजन तंत्रज्ञान प्रदात्यासोबत भारतात ग्रीन हायड्रोजनवर आधारित एकत्रित ऊर्जा उपाय सह-विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला. या कराराअंतर्गत भारतात ग्रीन हायड्रोजन-आधारित एकत्रित ऊर्जा उपायांचे सह-विकास केले जाईल. ही धोरणात्मक भागीदारी ग्रीन हायड्रोजनला भविष्यातील स्वच्छ इंधन म्हणून पुढे नेण्यासाठी टोयोटाच्या फ्युएल सेल तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या भूमिकेला अधोरेखित करते. तसेच हे कंपनीच्या मोबिलिटी आणि स्थिर ऊर्जा उपयोगांमधून मजबूत हायड्रोजन अर्थव्यवस्था उभारण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उदाहरण आहे.भारताने 2047 पर्यंत ऊर्जा स्वावलंबन प्राप्त करण्याचे आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी देशाच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत सर्व आर्थिक क्षेत्रांमध्ये नवनिर्मित ऊर्जा वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रीन हायड्रोजन हा या बदलासाठी एक आशादायक पर्याय म्हणून उदयास येत आहे. दीर्घकालीन नवीकरणीय ऊर्जा संचय, औद्योगिक क्षेत्रातील जीवाश्म इंधनांचे पर्याय (विशेषतः अवघड उद्योग क्षेत्रांमध्ये), स्वच्छ वाहतूक आणि विकेंद्रित ऊर्जा निर्मिती यासाठी ग्रीन हायड्रोजन प्रभावी ठरू शकतो. या दृष्टीकोनाशी सुसंगत, भारत सरकारने 2023 मध्ये राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मोहिम सुरू केली, ज्याचा उद्देश स्थानिक गुंतवणूक आणि संशोधनाच्या आधारे आत्मनिर्भर हायड्रोजन अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे. टॉयोटाच्या जागतिक ‘एन्व्हायर्नमेंटल चॅलेंज 2050’ या उपक्रमाच्या मार्गदर्शनाखाली टीकेएम या दृष्टीकोनाशी एकनिष्ठ राहून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील पुढाकारात अग्रेसर राहिली आहे. हे सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणासाठी हायड्रोजनचा संपूर्ण उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
ओहमियमसोबतचा टीकेएमचा नवा सामंजस्य करार ही कंपनीच्या प्रवासातील एक धोरणात्मक झेप आहे, ज्यामध्ये मोबिलिटीपलीकडे जाऊन हायड्रोजनवर आधारित ऊर्जा निर्मिती आणि तिच्या इकोसिस्टमच्या विकासावर भर दिला जातो. उच्च क्षमतेच्या भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर अशा संयुक्त उपक्रमांद्वारे टीकेएम ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देत आहे. जागतिक तंत्रज्ञान ज्ञानाचे रूपांतर देशाच्या ऊर्जा गरजांनुसार सुसंगत, स्थानिक स्तरावर उपयुक्त आणि पर्यावरणपूरक उपायांमध्ये करत आहे.या सातत्यपूर्ण उपक्रमांमध्ये मिराई एफसीईव्ही पायलट प्रकल्पांपासून ते एफसीएम मॉड्यूल पुरवठ्यापर्यंत आणि आता या स्वच्छ ऊर्जा सहकार्यापर्यंत टीकेएमने भारतात हायड्रोजनवर आधारित समाज निर्माण करण्याच्या दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतिबिंब दिसते. असा समाज जो हायड्रोजनचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विविध क्षेत्रांतील वापर यांना सहजपणे एकत्रित करतो, आणि त्याच वेळी भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संबंधित महत्त्वाकांक्षांशी सुसंगत राहतो. या संपूर्ण दृष्टीकोनाचे मूलभूत तत्त्व म्हणजे नवोन्मेष, सहनिर्मिती आणि स्थानिकीकरणाच्या माध्यमातून भविष्यासाठी बांधणी करणे.
या प्रसंगी बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षा श्रीमती मानसी टाटा म्हणाल्या :“टोयोटामध्ये आमची कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठीची बांधिलकी केवळ स्वच्छ मोबिलिटीपुरती मर्यादित नाही. ग्रीन हायड्रोजन ही केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर त्याच्या उत्पादन, वितरण आणि विविध वापरासाठी देखील एक महत्त्वाचा घटक आहे. ओहमियमसारख्या नावीन्यपूर्ण पीईएम तंत्रज्ञान कंपनीसोबतच्या सहकार्यामुळे आम्ही केवळ हायड्रोजन तंत्रज्ञानाला पुढे नेत नाही, तर ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही बळकटी देत आहोत. स्थानिक गरजांनुसार हायड्रोजन उपाय सह-विकसित करून, भारताच्या ऊर्जा परिवर्तनासाठी योगदान देणे आणि हायड्रोजन इकोसिस्टममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे, हा आमचा हेतू आहे.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डिप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर , कॉर्पोरेट प्लॅनिंग, ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट, श्री. स्वप्नेश आर. मारू आपले विचार व्यक्त करताना म्हणाले :“भारत सध्या आपल्या स्वच्छ ऊर्जा प्रवासात एक परिवर्तनात्मक वळणावर उभा आहे, जिथे ऊर्जा स्वावलंबन व दीर्घकालीन शाश्वततेसाठी एक स्पष्ट दृष्टिकोन आहे. टीकेएममध्ये, आम्ही एक मल्टी-पाथवे दृष्टिकोन स्वीकारत पर्यावरणीय प्रयत्न विविधीकृत करत आहोत, जेणेकरून गतीने आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करता येईल. या दिशेने ओहमियमसोबतचे हे सहकार्य केवळ ‘मोबिलिटी’च्या पलीकडे आहे. हा एक संयुक्त प्रयत्न आहे जे हायड्रोजनवर आधारित, आत्मनिर्भर, समावेशक आणि भविष्याभिमुख भारत घडविण्यासाठी आहे. आम्ही हायड्रोजनला केवळ इंधन म्हणून नव्हे, तर मोबिलिटी, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात शाश्वततेला चालना देणारा एक उत्प्रेरक म्हणून पाहतो. जागतिक तज्ज्ञता आणि भारत-केंद्रित नवकल्पना एकत्र करून आम्ही पर्यावरणपूरक उपाय सादर करत आहोत आणि ‘हॅप्पी पाथ्स टूगेदर’ घडवत आहोत.”