येवला : आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करणे काळाची गरज आहे सायकल हे ध्वनी आणि वायू प्रदूषणमुक्त वाहन असल्याने आरोग्य, पर्यावरण या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवण्याचे काम सायकलीमुळे शक्य होते. त्यामुळे सायकलचा वापर निश्चितच वाढवायला हवा, असे प्रतिपादन गुरुदत माध्यमिक विद्यालयचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास गायकवाड यांनी केले. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे यथोचित सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाळेच्या समोर वृक्षारोपण करण्यात आले.
येवला तालुक्यातील धामोडा येथे ओमसाई स्पोर्ट्स सायकल, माणुसकी फाउंडेशन नगरसूल प्रेस क्लब, ज्ञानसंपदा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सायकल हे ध्वनी आणि वायू प्रदूषण मुक्त वाहन असल्याने या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवण्याचे काम सायकलीमुळे शक्य आहे. त्यामुळे सायकलचा वापर निश्चितच वाढवायला हवा. या वेळी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अकलेश कासलीवाल , गणेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ओम साई सायकलचे संचालक महेश सोनवणे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.पत्रकार संघाचे भाऊलाल कुडके, नगरसुल प्रेस क्लबचे अध्यक्ष योगेश गंडाळ, जनार्दन भड, योगेश गाडेकर, रामभाऊ डोंगरे, सागर सोनवणे,बाळू कांगणे,योगेश वाल्मिक गाडेकर, अनिल जाधव, संतोष बटाव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचान श्री.शिवाजी भालेराव यांनी केले.प्रास्तविक शशिकांत गायकवाड यांनी केले.आभार मुख्याध्यापक श्री. अर्जुन घोडेराव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग प्रतिनिधी प्रसिद्धी प्रमुख एकनाथ भालेराव यांनी पुढाकार घेतला व कार्यक्रमाचे नियोजन केले.