दारणा धरणावर १००० विविध फळझाडे व देशी झाडे यांचे वृक्षारोपण
जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळा कडून कार्यक्रमाचा शुभारंभ......
इगतपुरी : सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कुणाशीही घेणेदेणे राहत नसल्याचे पहावयास मिळते. आपला घरप्रपंच भला की आपण भले, यातच आनंद मानणारे आपण सभोवती पाहतो. मात्र निवृत्ती नंतरही आपल्या विविधांगी कार्यातून जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ यांनी सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. सर्व सभासद एकत्र येऊन पर्यावरणाचा संदेश देऊन जनजागृती करीत आहेत. अनेक कारणांनी पर्यवरणाचा ऱ्हास होतांना दिसत आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ सरसावले आहेत. यांच्या पुढाकारातून दारणा धरण परिसरात जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त अभियंता यांचे वतीने नारायण उपनिषद ..नारायण उपनिषद म्हणून नव वृक्षांचे रोपांचे प्राणप्रतिष्ठा स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या एक वर्षांपासून सर्व जलसंपदा निवृत्त अधिकारी एकत्र येऊन एकमेकांकडून लोकवर्गणीतून वृक्षलागवड, गरिबांना मदत असे स्तुत्य उपक्रम करीत आहे. निवृत्त अभियंता सुहास पाटील, प्रमोद जावळे, अविनाश पाटील, गिरीष कंकरेज, देशमुख, शर्माजी, महाजन, पाथरकर, अहिरराव, थोरात, मिसाळ, कापडणीस, भंगाळे व धरणावरील संदीप मते यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते. याप्रसंगी निवृत्त अभियंतांनी त्यांचे अनुभव, कविता, गाणी, भावगीत, भजन आदींनी मंत्रमुग्ध केले होते. जावळे सर, ढिकले सर ई. वयोवृद्ध अभियंत्यांनी जीवन किती सुंदर आहे याचा अनुभव करून दिला. दारणा धरणाची माहिती दिली. वृक्षांमुळे ऑक्सिजन मिळते, मानवाचे जीवन सुरक्षित होते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी झाडे लावणे महत्वाचे असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे पण सांगितले.