Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आग लागल्याची अफवा ः चालत्या ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या; अनेकांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याजवळील घटना

0 3 2 1 2 3

जळगाव – : जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याजवळ मोठा रेल्वे अपघात घडल्याची दुदैवी घटना घडली आहे. मुंबईला जाणार्‍या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणार्‍या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सुमारे अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजतेे. तर मृतांचा अकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
12629 कर्नाटक संपर्क क्रांती यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जात होती तर पुष्पक एक्सप्रेस लखनऊहून मुंबईला जात होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेक लावल्यावर पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघत होता. ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली. यानंतर अनेक प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या. रेल्वे अधिकार्‍यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते, त्यामुळे ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना ट्रेनच्या आगमनाची जाणीव झाली नाही.
सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुष्पक एक्सप्रेसमध्ये चुकीचा फायर अलार्म वाजल्याने स्टेशनवर गोंधळ उडाला. कर्नाटक एक्सप्रेस दुसर्‍या ट्रॅकवर पडल्याने अनेक प्रवाशांना धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे