अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकच्या वतीने निवेदन
अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकच्या वतीने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटने बाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले निवेदन
किरण घायदार, नाशिक दि. 30 :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8-9 महिन्यातच कोसळला. ही अतिशय भयंकर आणि गंभीर बाब असून याची एस आय टी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. जलज शर्मा यांना देण्यात आले. महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख नानासाहेब बच्छाव, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके व रमेश खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर यांच्या उपस्थितीत सदरचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.
यावेळी नानासाहेब बच्छाव, शहराध्यक्ष संजय फडोळ, राजेंद्र शेळके, योगेश पाटील, स्वातीताई जाधव, शोभाताई सोनवणे, शिवव्याख्याते गौरव गाजरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणूनबुजून करण्यात आलेला कमकुवत पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो हीच अतिशय शरमेची गोष्ट आहे. एका नवशिक्या शिल्पकाराने काय विचार करून असे कृत्य केले याची चौकशी व्हावी, तसेच यासाठी परवानगी देणारे अधिकारी, मंत्री आणि शासकीय कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही. मराठा समाज सहिष्णू असून सर्वांना सामावून घेण्याचे काम करणारा असून आमच्या दैवताची अशाप्रकारे विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित दुर्घटनेबाबत बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्री तसेच व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी असे मनोगतातून व्यक्त केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालून राजकोट किल्ल्यावर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्यदिव्य स्मारक आणि भोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करून शक्तिशाली असा पुतळा पुन्हा उभारावा असे यावेळी मनोगत मांडण्यात आले.
यावेळी अविनाश वाळुंजे, विश्वास वाघ, अनिल आहेर, उदय देशमुख, रुपाली सोनवणे, वैभव वडजे, रोहन भोसले, राम निकम, ज्ञानेश्वर सुरासे, सुनीता पाटील, विकास रसाळ, मिलिंद महाले, सनुप जाधव, विलास गडाख आदींसह अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.