Breaking
ई-पेपरसामाजिक

बेशिस्त दुचाकी वर कारवाई : विंचूरला “कही ख़ुशी, कही गम” चा माहोल

ग्रामपंचायत लक्ष घालण्याची मागणी

0 3 2 1 2 3

विंचूर येथील मारवाडी पेठेत रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकीवर पोलीस कारवाई गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे काही नागरिकांना आनंद होत आहे. मात्र कारवाई झालेल्या वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ‘कही खुशी काही गम’ असे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन त्यांचे कर्तव्य बजावत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाची याबाबत भूमिका काय आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, विंचूर शहरातील मारवाडी पेठ तसेच बाजार गल्ली या दोन गल्ल्यामध्ये अनेक प्रकारच्या दुकाना आहेत. या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येतात. बहुतांशी ग्राहक हे दुचाकीवरून येतात. दुचाकी वरून येणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत दुचाकी पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. कारण एका दुकानासमोर दोन-तीन वाहने उभी असल्यास आणखी वाहन कोठे लावायचे असा प्रश्न वाहनधारकांना निर्माण होतो. परिणामी वाहनधारक आपली वाहने रस्त्यातच उभी करून दुकानात खरेदीसाठी जातात.

 पेठेत जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, बॅंका पतसंस्था, शेतमालाची दुकाने, दवाखाने, कापड दुकाने, ज्वेलरी शॉप, असे विविध प्रकारची दुकाने असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी या ठिकाणी मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये अशी सर्वांची भावना असते. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे असे म्हटले जाते मात्र वारंवार ग्राहक बदलत असतात. दर दिवशी नवीन नवीन ग्राहक बाहेर गावातून येतात. अशा वाहनधारक ग्राहकांना पोलीस कारवाईबाबत कुठलीही कल्पना नसते. त्यामुळे अचानक झालेल्या कारवाईमुळे अशा वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 दुकानासमोर वाहने लावली तर दुकानदार वाहने लावू देत नाही त्यामुळे वाहन कोठे लावावे असा प्रश्न नागरिकांना निर्माण होतो.

 खरे तर हा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवायला हवा. दुचाकी पार्किंग साठी जागा निश्चित होण्यासाठी त्या जागेवर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात यावे, पार्किंग साठी योग्य असे फलक लावण्यात यावे, रस्त्यात वाहने लावू नये यासाठी वाहनधारकांना सूचना मिळेल तसेच कारवाई पासून आपले वाहन वाचवता येईल याबाबतच्या सूचना देणारे फलक लावण्यात यावे. जेणेकरून नवीन येणाऱ्या वाहनधारक ग्राहकांना कारवाई बाबतची पूर्वकल्पना मिळेल. कारण पोलीस कारवाई जरी सध्या सुरू आहे तरीही कारवाई मात्र किती दिवस सुरू राहणार असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. ग्राम पालिका प्रशासनाने पार्किंग समस्या कडे लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याची नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

लासलगाव येथे विंचूर रोडवर दुचाकी पार्किंग ची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने दुकान च्या समोर सफेद रंगाचे पट्टे मारून दुचाकी पार्किंग ची जागा निश्चित केली आहे. याच धर्तीवर विंचूर ग्रामपालिकेनेही सफेद रंगाचे पट्टे मारून दुचाकी पार्किंगची जागा निश्चित करावी अशी मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे